श्रीरामनगर पुनर्वसनातील ग्रामस्थांचा थरारक निर्धार! “मागण्या पूर्ण करा… अन्यथा आम्ही आमच्या स्वगावीच राहणार!”

अपराध महाराष्ट्र शिक्षा स्वास्थ्य

श्रीरामनगर पुनर्वसनातील ग्रामस्थांचा थरारक निर्धार!
“मागण्या पूर्ण करा… अन्यथा आम्ही आमच्या स्वगावीच राहणार!”

श्रीराम नगर पुनर्वसन –
आज दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी श्रीराम नगर पुनर्वसन येथील संपूर्ण ग्रामस्थांनी आपल्या पुरणगाव कारीमाती – नवलेवाडी – जलकरगोंदी या मूळ गावी पुनःप्रवेश केला आहे.

सन 2012-13 मध्ये वनविभागाच्या पुनर्वसन योजनेअंतर्गत ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात आले होते. मात्र पुनर्वसनातील सर्व 16 मागण्या अपूर्णच राहिल्यामुळे, आज सकाळी 11 वाजता संतप्त ग्रामस्थांनी ट्रॅक्टर, बैलबंडी व मोटारसायकलींनी मोठ्या रॅलीच्या स्वरूपात स्वगावी परतीचा निर्णय घेतला.

या आंदोलनात सुमारे 700 ते 800 नागरिकांनी सहभाग नोंदविला.

ग्रामस्थांचा ठाम इशारा —

> “जेव्हा पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत,
तेव्हा पर्यंत आम्ही पुनर्वसनात परतणार नाही!
आमचं जगणं-मरणं जंगलाशीच जोडलेलं आहे.”

 

नवेगाव-नागझिरा टायगर रिझर्व परिसरात जंगली पशूंचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने ग्रामस्थांना जीविताचा मोठा धोका संभवतो. या संदर्भात ग्रामस्थांचे स्पष्ट विधान —

> “कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास
जबाबदार प्रशासन व वनविभाग राहील!”

 

ग्रामस्थ परतल्याने वनविभाग व प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून पुढील घडामोडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *